देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस विनामूल्य देण्यात येईल. प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणावर सरकार ५०० रुपये खर्च करील, अशी घोषणा केंद्रीय राज्यमंत्री प्रताप सारंगी यांनी केली आहे.
बिहारमधील निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपकडून ‘बिहारच्या जनतेला विनामूल्य लस देण्यात येईल’, अशी घोषणा करण्यात आल्यावर त्याचा देशभरातून विरोध चालू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर सारंगी यांची घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.
Union Minister #PratapSarangi on Sunday said that all people of the country will be given free #COVIDvaccine, amidst the demand by opposition parties in the country for it and not only in poll-bound #Bihar as announced by the #BJP. https://t.co/xGkqEZyIId
— National Herald (@NH_India) October 26, 2020