News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला आहे. या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केले जातील, अशी माहिती आयोगाकडून देण्यात आली आहे.

या निवडणुकांबाबत कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींमुळे विलंब झाला होता. विशेषतः जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या पुनर्रचनेचा मुद्दा प्रलंबित असल्याने राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढ मागितली होती. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दोन आठवड्यांची मुदत देत निवडणुका घेण्यास परवानगी दिली.

यानंतर तातडीने आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मात्र या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्हे वगळण्यात आले असून त्याठिकाणी निवडणुका नंतरच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे संबंधित जिल्हा परिषद व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती क्षेत्रात आचारसंहिता तत्काळ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या भागात नवीन घोषणांवर आणि शासकीय निर्णयांवर मर्यादा राहणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागांचा समावेश आहे.