नाशिक | दि. १६ एप्रिल २०२५
भारतीय हवामान विभागाच्या पुणे येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात १६ ते २० एप्रिल दरम्यान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत किमान तापमान २०-२३ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून दुपारनंतर उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे.

हवामानाच्या पार्श्वभूमीवर कृषी व पशुपालन सल्ला जारी
उच्च तापमान व उष्ण वारे यांचा फटका शेती व जनावरांवर होऊ नये, म्हणून कृषी व हवामान तज्ञांनी शेतकऱ्यांना पुढील उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे:

जनावरांना स्वच्छ, थंड व भरपूर पाणी द्यावे.

सकाळी व संध्याकाळी चारापाणी द्यावे.

जनावरांना उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून छायाच्छादनाची सोय करावी.

उन्हामुळे जनावरांना उन्हाळी ताप, थकवा व रोग होण्याचा धोका वाढतो; त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय घ्यावेत.

उष्माघात टाळण्यासाठी जनावरांना ५-६ वेळा थंड पाणी द्यावे.

जमिनीची मशागत करताना सकाळी व संध्याकाळीच कामे करावीत.


उष्माघाताची लक्षणे:
जनावरांचे अन्न न खाणे, तापमान वाढणे, थकवा येणे, लाळ येणे, श्वासोच्छ्वास वाढणे, शरीर थंड ठेवणे अशक्य होणे इत्यादी.

कृषीविषयक सल्ला:
उच्च तापमानामुळे भात, भुईमूग, फळबागांवरील फळे झाडांवरून खाली पडण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे.

हवामान आधारित कृषिसल्ला व पत्रिका:
१७ एप्रिल रोजी हवामान आधारित कृषिसल्ला पत्रिका प्रसिद्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्रोत:
ग्रामीण कृषी हवामान सेवा, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी
माहिती सौजन्य: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी