‘त्रिपुर या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यास संतुष्ट करून घेतले. मध्यंतरी इतर देवांनी त्याच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी पुष्कळ खटपट केली; परंतु ती व्यर्थ गेली. ब्रह्मदेव वर देण्यास सिद्ध झाला. त्रिपुराने ‘मला अमरत्व प्राप्त व्हावे’, असा वर मागितला. वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवांस सतावून सोडले. प्रत्यक्ष श्रीविष्णूसही त्या त्रिपुराचा प्रतिकार करता आला नाही. शेवटी शंकराने तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्या दैत्याचा वध करून देवांचे गेलेले वैभव त्यांना परत मिळवून दिले. आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवांस आनंदीआनंद झाला आणि त्यांनी शंकराची स्तुती करून दीपोत्सव केला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेस हा उत्सव साजरा केला जातो.’

त्रिपुरारि पौर्णिमेला मोठ्या उंच दगडी खांबाला सभोवती दिवे लावण्याची व्यवस्था करून तिथे दिवे लावले जातात. या खांबांना त्रिपुरी म्हणतात.

तेजाचे अधिष्ठान असलेला हा दिवस दिपोत्सवाच्या रूपात साजरा केला जातो.

संदर्भ व अधिक माहिती – सनातन संस्था