statue of chhatrapati shivaji maharaj decorated with flowers
Photo by Karan Ghadi on Pexels.com

UNESCO यादीत समावेश – महाराष्ट्राच्या शौर्याचा जागतिक सन्मान

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित महाराष्ट्रातील १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या शौर्य, पराक्रम आणि समृद्ध ऐतिहासिक वारशाचा जागतिक स्तरावर सन्मान करणारा ठरला आहे.

महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग, तसेच तमिळनाडूमधील जिंजी किल्ला. हे सर्व किल्ले शिवाजी महाराजांच्या युद्धनीती, स्वराज्य स्थापनेचा इतिहास आणि स्थापत्यकलेचे प्रतीक मानले जातात.

या ऐतिहासिक यशामुळे महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार असून, या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आता जागतिक निधी व तांत्रिक मदत मिळणार आहे. UNESCO चा हा निर्णय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीला एक नवे स्थान देतो.

राज्य सरकारने या घोषणेनंतर आनंद व्यक्त केला असून, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाने पुढील पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. ऐतिहासिक स्थळांचे जतन, डिजिटल डॉक्युमेंटेशन आणि पर्यटन सुविधांची वाढ यावर भर दिला जाणार आहे.

हे किल्ले केवळ स्थापत्यशास्त्राचे नमुने नाहीत, तर स्वराज्याची आणि आत्मगौरवाची प्रेरणा देणारी स्मारके आहेत. त्यांचा जागतिक स्तरावर झालेला गौरव ही प्रत्येक मराठी मनासाठी अभिमानाची बाब आहे.