News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई | ऑगस्ट 2025
गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत गोविंदांच्या सुरक्षेसाठी विमा कवच जाहीर केलं आहे. राज्यभरात दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्या 1.5 लाख गोविंदांना विमा संरक्षण दिलं जाणार आहे.

ही योजना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबवली जाईल आणि प्रत्येक गोविंदासाठी 75 रुपयांच्या दराने विमा हप्त्याचा खर्च सरकार करणार आहे. त्यामुळे गोविंदांना कोणत्याही अपघाताच्या प्रसंगी वैद्यकीय आणि आर्थिक मदत मिळू शकेल.

अपघातग्रस्त गोविंदांसाठी विशेष योजना:

दहीहंडी उत्सवात मानवी पिरॅमिड तयार करताना अनेक वेळा गोविंद जखमी होतात. ही बाब लक्षात घेऊन खेळ विकास निधीतून एकूण 1 कोटी 12 लाख रुपयांचा निधी विमा योजनेसाठी मंजूर करण्यात आला आहे.

या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा संघ आणि राज्याचा क्रीडा व युवक सेवा विभाग यांच्या समन्वयातून केली जाणार आहे.

योजनेचे महत्त्व:

ही विमा योजना गोविंदांना अधिक सुरक्षित आणि आत्मविश्वासाने सहभाग घेण्यास प्रवृत्त करणार आहे. दहीहंडीचा सांस्कृतिक व पारंपरिक उत्सव सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने उचललेले हे पाऊल स्तुत्य आहे, असे विविध सामाजिक संघटनांनी सांगितले आहे.