कर्णावती (गुजरात) – गुजरात सरकारने पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी ही घोषणा केली. वाघानी म्हणाले की, केंद्र सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसारच हे पालट करण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती आणि ज्ञान व्यवस्था यांचा शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये समावेश करण्यात येणार असून वर्ष २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून हा पालट होईल. श्रीमद्भगवद्गीतेतील मूल्य आणि तत्त्व प्राथमिक स्तरावर इयत्ता ६वी ते १२वीच्या वर्गांमध्ये शिकवले जातील. गीतेतील श्लोक ‘सर्वांगी शिक्षण’ पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. इयत्ता ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक भाषेमधून गोष्टीच्या स्वरूपात गीता शिकवली जाईल. यासमवेतच शाळांमध्ये प्रार्थना, श्लोकपठण, नाटक, प्रश्नमंजुषा, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातूनही श्रमद्भगवद्गीतेचे शिक्षण दिले जाईल.
ठळक बातम्या
रविवारी, महाराष्ट्राच्या उत्तर भागात गारपिटीचा इशारा
महाराष्ट्राच्या काही भागात पावसासह जोरदार वारे, गडगडाट आणि विजांचा कडकडाट होईल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते असाही त्यांचा अंदाज आहे.
हवामानाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणतात की भारताच्या काही भागात मोठे वादळ येणार आहे. हे 26 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि देशाच्या वायव्य आणि पश्चिमेकडील ठिकाणांवर परिणाम करेल. वादळ होईल कारण पश्चिमेकडून येणारे थंड वारे दक्षिणेकडील उष्ण वाऱ्यांसोबत मिसळतील.
यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आकाशातून गारा पडतील. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशा काही शहरांमध्ये रविवारी गारपीट होईल. त्याचवेळी अरबी समुद्रात आणखी एक वादळ निर्माण होत आहे. या वादळामुळे हवामान ढगाळ होत असून हवा ओली होत आहे. शुक्रवारी काही ठिकाणी ढगाळ आणि थंडी होती, मात्र दुपारी उष्णतेने ढग निघून गेले. संध्याकाळी ढग परत आले. विदर्भात तापमानात कमालीची घसरण झाली आहे.
आणखी वाचा
शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणा अंतर्गत होणार नसल्याचा निर्णय
मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने तूर्तास राज्यातील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाअंतर्गत होणार नसल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मराठा आरक्षणामुळं अकरावी तसेच...