प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात प्लास्टिक उत्पादकांची जबाबदारी निश्चित करणारी अधिसूचना केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने जारी केली आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांअंतर्गत हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामानबदल खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं की एकदाच वापरण्याजोग्या प्लास्टिकचा वापर बंद करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं होतं, त्यानुसार ही पावलं उचलण्यात आली आहेत. प्लास्टिक कचरा कमीतकमी तयार व्हावा, त्याचं पुनर्चक्रीकरण व्हावं, तसंच प्लास्टिकला पर्याय शोधण्यासाठी प्रोत्साहन मिळावं या दृष्टीने हे दिशानिर्देश बनवण्यात आले असून उत्पादकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था, दुकानदार, ग्राहक यांच्याही जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
ठळक बातम्या
‘चॅटजीपीटी’ला प्रत्युत्तर म्हणून गूगलने आणला ‘बार्ड’ !
आता ‘गूगल’ आस्थापनानेही त्याचे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (ए.आय.) म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेविषयीची संभाषणात्मक संगणकीय प्रणाली ‘बार्ड’ चालू केली आहे. गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी...
आणखी वाचा
गोदा युनियन संस्थेवर शेतकरी विकास पॅनेलची सत्ता; प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवून पॅनल...
सिन्नर (Sinnar) - तालुक्यातील नायगाव (Naygaon) येथील गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी दि 12 मार्च 2022 रोजी मतदान झाले.
सिन्नर तालुक्यातील...